ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते या गाण्याची ओळी गेली अनेक वर्षे मनात रुंजी घालताहेत पण नक्की का आणि काय वाटतंय हे व्यक्त व्हायला मात्र आजचा दिवस उजाडला. निमित्त आषाढी एकादशीचं. जशी आषाढी एकादशी जवळ येते, वारीची क्षणचित्रे आणि बातम्या येऊ लागतात तसं मन भूतकाळाचा वेध घेऊ लागतं. आणि याला कारणही तसंच आहे, ते म्हणजे माझे आजी आजोबा. आता आजोबांना जाऊन १५ आणि आजीला जाऊन ५ वर्षे होऊन गेली पण ह्या व्यक्ती, त्यांच्या आठवणी मात्र आजही मनात तितक्याच स्पष्ट. कदाचित वाढत्या वयाबरोबर आणि अनुभवाबरोबर जाणीवा अजूनच तीव्र झाल्या असतील कदाचित. आणि म्हणूनच आज हा लेखनप्रपंच. गेले काही वर्षं मी न चुकता व्हाट्सअँप स्टेटस ला एक फोटो आणि ओळ लावते, ती म्हणजे " आषाढी एकादशी म्हणजे तुमची आठवण येतेच. साक्षात विठोबा रखुमाईच !! " तर ही गोष्ट आहे एका खऱ्या खुऱ्या विठोबा रखुमाईची म्हणजेच माझे आजी आणि आबा. (माझ्या आईचे आई वडील ) यांची . सुधा आजी म्हटलं कि आजही डोळे मिटल्या वर गोरीपान, हसतमुख, बेताची उंची, गोबरे गाल, मोठं कुंकू, विरळ पण काळेभो...