एक अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे मी M.Sc ला असताना , पुणे विद्यापीठातून एक प्रदर्शन पाहून आम्ही मैत्रिणी परत येताना एक तर होस्टेलला पोहोचायला उशीर झाला होता आणि पाऊस पण येत होता म्हणून आम्ही बसमधूनउतरून फर्ग्युसन रोडवरून रिक्षाला हात केला तेव्हा दोन मुली रिक्षातून उतरल्या आणि आम्ही दोघी रिक्षात बसलो तेवढ्यात एक मोबाईल फोन आम्हाला सापडला म्हणून आम्ही रिक्षा काकांना म्हटलं कि हा मोबाईल आत्ता उतरलेल्या मुलींचा असावा तर आपण त्या मुलींच्या मागे रिक्षा घेऊ , त्यांना मोबाईल देऊ आणि जाऊ . मीटर ची चिंता तुम्ही करू नका , तुम्हाला तुमचे पैसे मिळतील . असे बोलण झाल्यावर त्याने आम्हाला साफ नकार दिला आणि आमच्या हातातून फोन हिसकावून घेतला . हे पाहून मोबाईल हडप करण्याचा त्याचा विचार आमच्या लक्षात आला आणि आम्ही त्याचाशी वाद घालायला सुरुवात केली तसे तो मानून दारूच्या नशेत असल्याचे जाणवले . तेव्हा आम्हाला प्रश्न पडला कि आता अश्या माणसाशी या वेळी वाद घालून संकट ओढवून घ्यायचा कि आपल्यासमोर कोणी चोरी करतंय तरी निमुटपणे सगळा पाहत राहायचं ?? मग आम्ही जर युक्तीने ही समस्या सोडवण्याचा विचार केला ...